पुणे, प्रतिनिधी :
शिक्षण आणि साहित्य क्षेत्रात अविरत योगदान देणारे प्रा. डॉ. पी. जी. कदम (प्रकाश दत्तात्रय कदम) यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. ‘साहित्य सम्राट पुणे’ संस्थेच्या वतीने आयोजित ‘द्विशतकोत्तर रौप्य महोत्सव-२०२६’ अंतर्गत राज्यस्तरीय कवी संमेलन, बहुभाषिक कवितांची गाणी, पुरस्कार व पुस्तक प्रकाशन सोहळ्यात डॉ. कदम यांच्या दोन अत्यंत महत्त्वपूर्ण पुस्तकांचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते दिमाखात करण्यात आले.
हा भव्य सोहळा शुक्रवार, दिनांक ५ जून २०२६ रोजी दुपारी ४ ते ७ या वेळेत स्व.-विठ्ठलराव तुपे नाट्यगृह, माळवाडी, हडपसर, पुणे येथे पार पडला.
‘भिकाऱ्याचे जीवन’ आणि ‘तिन्हीसांजेला’ पुस्तकांचे प्रकाशन
या सोहळ्यात प्रा. डॉ. पी. जी. कदम लिखित खालील दोन पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले:
१. भिकाऱ्याचे जीवन (कादंबरी)
२. तिन्हीसांजेला (कवितासंग्रह)
या पुस्तकांच्या माध्यमातून त्यांनी पुन्हा एकदा समाजातील वास्तव आणि संवेदनशीलता आपल्या लेखणीतून मांडली आहे. या सोहळ्याला प्रमुख अतिथी आणि मार्गदर्शक म्हणून खालील मान्यवर उपस्थित होते:
श्री. विनोद अष्टुल (संस्थापक, अध्यक्ष – साहित्य सम्राट पुणे)
श्री. म. भा. चव्हाण (कवी संमेलनाध्यक्ष)
प्रा. डॉ. श्रीपाल सबनीस (संमेलनाध्यक्ष)
श्री. बबन पोतदार (ग्रामीण कथाकार)
श्री. प्रदीप निफाडकर (मसाप, कोषाध्यक्ष)
श्री. बबनराव गायकवाड (चेअरमन, रावळगाव सा. का., नाशिक)
श्री. सुनील लोखंडे (अधिसभा सदस्य, पुणे विद्यापीठ)
श्री. वि. ग. सातपुते (ज्येष्ठ साहित्यिक)
प्रा. डॉ. पी. जी. कदम यांचा संक्षिप्त जीवनप्रवास व शैक्षणिक कारकीर्द
उच्च शिक्षण व अध्यापन : गणित व विज्ञान विषयाचे गाढे अभ्यासक असलेल्या डॉ. कदम यांनी बी.एस्सी., एम.एस्सी., बी.एड., एम.फिल. आणि पीएच.डी. पर्यंतचे उच्च शिक्षण पूर्ण केले आहे. त्यांनी उपप्राचार्य, विभाग प्रमुख तसेच भारत विद्यालय व कन्या प्रशाला, पुणे येथे प्रदीर्घ काळ सेवा बजावली. यासोबतच महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे येथे सदस्य म्हणूनही योगदान दिले.
महाविद्यालयीन उपक्रम : त्यांनी महाविद्यालयीन स्तरावर स्नेहसंमेलन समितीचे अध्यक्षपद, वेळापत्रक, शिस्त व सहल विभाग प्रमुख म्हणून जबाबदाऱ्या सांभाळल्या, तसेच वैज्ञानिक तक्ते व विज्ञान प्रदर्शनांचे आयोजन केले.
मानद पीएच.डी. गौरव : त्यांच्या याच अष्टपैलू शैक्षणिक आणि सामाजिक योगदानाची दखल घेऊन अमेरिकेतील ‘अमेरिकन मॅनेजमेंट युनिव्हर्सिटी’ (American Management University) कडून त्यांना ५ जुलै २०२५ रोजी ‘मानद पीएच.डी.’ (Honorary Doctor of Philosophy in Education) बहाल करण्यात आली आहे.
समृद्ध ग्रंथसंपदा : यापूर्वी त्यांची ‘देव असता तर’ (प्रकाशन हस्ते: मा. अण्णा हजारे), ‘भैरवी’ (प्रकाशन हस्ते: माजी न्यायमूर्ती दिलीप कोळसे पाटील), ‘बालकविता’, ‘रस्ते आणि चेहरे’, ‘जीवन एक सापाशिडीचा खेळ’ आणि ‘सुशिक्षितांचे शिक्षण, सामान्यज्ञान व सहवास’ ही पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. आता त्यांच्या ताफ्यात ‘भिकाऱ्याचे जीवन’ आणि ‘तिन्हीसांजेला’ या दोन नव्या पुस्तकांची भर पडली आहे.
हडपसर येथील तुपे नाट्यगृहात पार पडलेल्या या दिमाखदार सोहळ्यात प्रा. डॉ. पी. जी. कदम यांच्यावर साहित्यिक, शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांकडून कौतुकाचा व शुभेच्छां
चा वर्षाव होत आहे.









